राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के जलसाठा शिल्लक

मुंबईः  राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात २५ मे अखेर ३६.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षी याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के एवढे

मुंबईत ‘सर्वांसाठी पाणी’ उपक्रम
व्हिलेज डायरी – सुरवात….
‘जलयुक्त शिवार योजने’चा फज्जा

मुंबईः  राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात २५ मे अखेर ३६.६८ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षी याच काळात हे प्रमाण ३६.२७ टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात ४०१ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

सध्या राज्यात धरणातील जलसाठ्याचा विचार करता अमरावती विभागात १,९२४ दशलक्ष घनमीटर म्हणजे विभागाच्या एकूण साठ्याच्या ४७.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

त्या पाठोपाठ मराठवाडा विभागात ३,३२७ द.ल.घ.मी. म्हणजे ४५.१३ टक्के, कोकण विभागात १,५६७ द.ल.घ.मी. म्हणजे ४४.६५ टक्के, नागपूर विभागात १,६२० द.ल.घ.मी. म्हणजे ३५.१८ टक्के, नाशिक ‍विभागात २,१३८ द.ल.घ.मी. म्हणजे ३५.६२ टक्के तर पुणे विभागात ४,३८१ द.ल.घ.मी. म्हणजे २८.८ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे.

टंचाईग्रस्त गावे, वाड्यांना आवश्यकतेनुसार टँकर्सद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात कोकण विभागात १५५ गावांना आणि ४९९ वाड्यांना १०१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात ११७ गावे, १९९ वाड्यांना १०२ टँकर्स, पुणे विभागात ७१ गावे आणि ३६० वाड्यांना ७० टँकर, औरंगाबाद विभागात ४३ गावे, २३ वाड्यांना ५९ टँकर, अमरावती विभागात ६९ गावांना ६९ टँकरद्वारेनपाणी पुरवठा करण्यात येत आहे.

नागपूर विभागात मे महिन्याअखेरीस देखील टँकरची आवश्यकता भासलेली नाही.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात टँकरग्रस्त गावांमध्ये ५३ ने आणि वाड्यांमध्ये ११६ ने वाढ झाली आहे. तसेच टँकरमध्ये ४६ ने वाढ झाली आहे. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण ४०१ टँकरमध्ये ८९ शासकीय आणि ३१२ खाजगी टँकरचा समावेश आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0