४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : बिहारमध्ये याचिका

४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : बिहारमध्ये याचिका

नवी दिल्ली : देशभरात झुंडशाहीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर लक्ष घालण्याची विनंती करणाऱ्या ४९ मान्य

अनुराग ‘डिसेंट’ कश्यप
बेनेगल, अपर्णा सेन, अनुरागसह अन्य ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे
उ. प्रदेश हिंसाचार : अनुराग, स्वराकडून न्यायालयीन चौकशीची मागणी

नवी दिल्ली : देशभरात झुंडशाहीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर लक्ष घालण्याची विनंती करणाऱ्या ४९ मान्यवरांच्या विरोधात बिहारमध्ये एका वकिलाने देशद्रोह व अन्य गुन्हे दाखल करावे यासंदर्भात एक याचिका स्थानिक न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकाकर्त्याचे नाव सुधीर कुमार ओझा असे असून त्याने अपर्णा सेन, शाम बेनेगल सहित ४९ मान्यवरांनी फुटीरतावाद्यांचे समर्थन करून देशाची प्रतिमा धुळीस मिळवली असल्याचा आरोप आपल्या याचिकेत केला आहे. त्यामुळे या ४९ मान्यवरांवर देशद्रोह व भारतीय दंडसहितेतील काही गुन्हे दाखल करावे असे ओझा यांचे याचिकेत म्हणणे आहे. ओझा यांनी साक्षीदार म्हणून अभिनेत्री कंगना रनौट, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर व विवेक अग्निहोत्री यांचे नाव याचिकेत घेतले आहे. या याचिकेवर सुनावणी येत्या ३ आँगस्ट रोजी होणार आहे.

गेल्या आठवड्यात केवळ अल्पसंख्याक समुदायावर झुंडशाहीकडून जीवघेणे हल्ले होत असून सरकारने त्याची तत्परतेने दखल घ्यावी अशी विनंती देशातल्या ४९ विचारवंत, कलावंत, साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली होती.

या पत्रावर प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल, अपर्णा सेन, अनुराग कश्यप, मणिरत्नम, शास्त्रीय संगीत गायिका शुभा मुदगल, इतिहासकार रामचंद्र गुहा, बंगालमधील ज्येष्ठ सिनेकलाकार सौमित्र चटर्जी, दक्षिणेतल्या सिनेनिर्मात्या व अभिनेत्री रेवती, सामाजिक कार्यकर्ते विनायक सेन व विख्यात सामाजिक शास्त्रज्ञ आशिष नंदी आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

या पत्रात या मंडळींनी ‘जय श्रीराम’चा नारा एक प्रकारचा युद्धघोष वाटू लागला आहे याबाबतही चिंता व्यक्त केली आहे. लोकशाहीत मतमतांतरे असतात व ती व्यक्त करणे अपरिहार्य व अपेक्षित आहेत पण या देशाचे नागरिक असून सुद्धा सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही, अर्बन नक्षल ठरवले जात आहे. प्रत्येक विरोध हा देशविरोधी भावनांशी जोडला जात असल्याच्या मुद्द्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले होते.

या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर बॉलिवूड व अन्य क्षेत्रातील ६१ जणांनी ४९ मान्यवरांवर तोफ डागणारे एक पत्र लिहिले होते. या ४९ जणांच्या पत्राने भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा कलंकीत केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाच्या विकासासाठी अथक प्रयत्न करत आहेत, जे ज्या पद्धतीने प्रशासन सांभाळत आहे, त्यांच्या प्रयत्नामुळे देशात सकारात्मक राष्ट्रवाद व मानवतावाद निर्माण होत असताना त्याबद्दल नकारात्मकता पसरवण्याचे काम ही मंडळी करत असल्याचा आरोप प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कंगना रनोट, सिनेकवी प्रसून जोशी, नृत्यांगना सोनल मानसिंग, चित्रपट दिग्दर्शक मधूर भांडारकर, विवेक अग्निहोत्री यांच्यासह अन्य क्षेत्रातील व्यक्तींनी केला होता. झुंडशाहीबद्दल सरकारला जाब विचारणे स्वत:ला स्वयंघोषिक रक्षक समजत असून त्यांची भूमिका पक्षपाती व विशिष्ट राजकीय उद्दिष्टातून आलेली आहे अशी टीका या पत्रात केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: