गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

मुंबईः आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढी पाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात य

रविवारी ‘जनता कर्फ्यु’ – मोदींचे आवाहन
‘निर्बंध नको असतील तर लसीकरण अपरिहार्य, मास्क वापरा’
राज्यात नवे निर्बंध लागू

मुंबईः आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढी पाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून कोरोना निर्बंध हटवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलिस यंत्रणा, महापालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले. 

लोकलप्रवासासाठी लसीचा १ डोस पुरेसा

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार मुंबईत लोकल प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेणे बंधनकारक ठेवले आहे. या अगोदर लोकल प्रवासासाठी दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र आवश्यक होते.
राज्य सरकारने दोन डोसची अट जरी रद्द केलेली असली तरी गाफील नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये. ज्यांचं लसीकरणं राहिलेलं आहे, त्यांनी आपापलं लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0