भारताची स्थिती मागे उडणाऱ्या विमानासारखी – अरुंधती रॉय

भारताची स्थिती मागे उडणाऱ्या विमानासारखी – अरुंधती रॉय

नवी दिल्ली: बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी भारताची तुलना मागे उडणाऱ्या विमानाशी केली आहे. त्या म्हणाल्या की हे एक विमान आहे जे अपघात

मोदी खोटे बोलू शकतात आणि आम्ही हसलो तर गुन्हा?
आता तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही: अरुंधती रॉय
दाहक, अस्वस्थ करणारा अनुभव : ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅप्पीनेस’

नवी दिल्ली: बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी भारताची तुलना मागे उडणाऱ्या विमानाशी केली आहे. त्या म्हणाल्या की हे एक विमान आहे जे अपघाताच्या दिशेने जात आहे.

‘व्हाय डू यू फियर माय वे सो मच’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना राय यांनी ही टीका केली. हे पुस्तक तुरुंगातील मानवाधिकार कार्यकर्ते जीएन साईबाबा यांच्या कविता आणि पत्रांचे संकलन आहे.

रॉय म्हणाल्या की १९६० च्या दशकात मालमत्ता आणि जमिनीच्या पुनर्वितरणाची खरी क्रांतिकारी चळवळ सुरू झाली होती. मात्र आज देशातील नेते ५ किलो तांदूळ आणि १ किलो मीठ वाटून मते मागत आहेत आणि निवडणुका जिंकत आहेत.

राय म्हणाल्या, “अलीकडेच मी माझ्या एका पायलट मित्राला विचारले,  की तो विमान मागे चालवू शकतो का? तर तो जोरात हसला. मी म्हणाले पण खरेच आज इथे हेच होत आहे. नेते या देशाला पाठीमागे चालवत आहेत, सर्व काही कोसळत आहे आणि आपण अपघाताच्या दिशेने जात आहोत.”

तुमच्या ‘जात, वर्ग, लिंग आणि वांशिकतेच्या आधारे वेगळ्या पद्धतीने इथे कायदे लागू केले जातात, असे रॉय यांनी भारताचे वर्णन केले.

त्या म्हणाल्या, ‘आज आपण इथे काय करतोय? ९० टक्के अर्धांगवायू झालेल्या आणि गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एका प्राध्यापकाबद्दल बोलण्यासाठी आम्ही जमलो आहोत. आम्ही तेच करत आहोत. हे पुरेसे आहे. आम्हाला आता बोलण्याची गरज नाही. आपण कोणत्या देशात राहत आहोत हे सांगण्यासाठी ही बाब पुरेशी आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे.”

शारीरिकदृष्ट्या ९० टक्क्यांहून अधिक अक्षम असणाऱ्या जी. एन. साईबाबा, यांना महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने २०१७ मध्ये जी.एन. साईबाबा आणि इतरांना दहशतवादविरोधी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (UAPA) दोषी ठरवले. आणि माओवाद्यांशी संबंध ठेवल्याबद्दल आणि ‘देशाविरुद्ध युद्ध पुकारलेल्या कारवायांमध्ये’ गुंतल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

राजधानी दिल्लीत जवाहर भवन येथे पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी जी.एन. साईबाबांच्या तात्काळ सुटकेच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, सध्याचे सरकार एखाद्या कम्युनिटाला दहशतवादी’ ठरवून तुरुंगात टाकू शकते, असे वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे.

ते पुढे म्हणाले, “आजच्या सरकारला वाटते की काही लोकांना ‘शहरी नक्षल’, ‘देशद्रोही’, ‘दहशतवादी’ असे लेबल लावून किंवा त्यांना तुरुंगात डांबून किंवा त्यांच्यावर अत्याचार करून ते यशस्वी होऊ शकतात.”

डी.राजा म्हणाले, “मी त्यांना सावध करतो की ते कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. कम्युनिस्ट मारला जाऊ शकतो, पण माननीय मोदी कम्युनिस्ट कधीही पराभूत होऊ शकत नाहीत.”

साईबाबांच्या पत्नी वसंता यांनीही पुस्तकाच्या प्रकाशनाला हजेरी लावली. त्यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशातील अमलापुरम शहरात गरिबीत जन्मलेल्या त्यांच्या पतीने आपल्या शारिरीक अपंगत्वावर मात करून विद्यापीठात उच्च स्थान मिळवले आणि ते एक अत्यंत प्रतिष्ठित प्राध्यापक बनले.

त्यांनी जी.एन. साईबाबांना त्यांच्या हृदयाची स्थिती, तीव्र आणि मणक्याचे तीव्र दुखणे असून, त्यांना आईच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्यासाठी पॅरोल नाकारल्याचे सांगितले.

‘व्हाय डू यू फियर माय वे सो मच’, हे पुस्तक स्पीकिंग टायगरने प्रकाशित केले असून ते ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: