सुप्रीम कोर्टाकडूनही बाबा रामदेवांना समज

सुप्रीम कोर्टाकडूनही बाबा रामदेवांना समज

नवी दिल्लीः अॅलोपथी या आधुनिक वैद्यकीय चिकित्सा पद्धतीवर बाबा रामदेव यांच्याकडून होणाऱ्या टिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरन

मोदींची फसवी ‘ब्रँड’रणनीती
जगणं शिकवून गेलेला माणूस
‘आध्यात्मिक’ वाहिन्यांचे अर्थकारण : भाग २

नवी दिल्लीः अॅलोपथी या आधुनिक वैद्यकीय चिकित्सा पद्धतीवर बाबा रामदेव यांच्याकडून होणाऱ्या टिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश रमणा यांनी बाबा रामदेव यांना काय झालेय? असा सवाल उपस्थित करत बाबा रामदेव आपली आरोग्य चिकित्सा प्रणाली लोकप्रिय करू शकतात, पण अन्य प्रणालींवर टीका करण्याची गरज काय. आम्ही त्यांचा आदर ठेवतो, त्यांनी योगला लोकप्रियता दिली असली तरी त्यांनी अन्य आरोग्य प्रणालींवर टीका करता कामा नये. त्यांच्याकडे उपचारासाठी जाणारे ठीकठाक होतील, याची गॅरंटी काय आहे, असे प्रश्न सरन्यायाधीशांनी उपस्थित केले.

बाबा रामदेव यांना हायकोर्टाकडून मिळाली होती समज

गेल्या आठवड्यात अॅलोपथीच्या विरोधात विधाने करून त्याच्या दुष्प्रचार करू नये व जनतेची दिशाभूलही करू नये. कोरोनील औषधासंबंधात अधिक काही बोलू नये, अशी समज दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना दिली होती. आपले असंख्य अनुयायी आहेत व त्यांचा आपल्या कोणत्याही विधानांवर विश्वास बसत असतो पण आपण मोठ्या प्रमाणावर अधिकारवाणीने अधिक बोलून जनतेची दिशाभूल करू नये, असे न्या. अनुप जे भंभानी यांनी रामदेव बाबा यांना म्हटले होते.

कोविड-१९ महासाथीत पतंजली आयुर्वेद कंपनीने आपले कोरोनील औषध बाजारात आणले होते व हे औषध कोरोनावर गुणकारी असल्याचा दावाही करण्यात आला होता. बाबा रामदेव यांनी कोरोना महासाथ पसरण्यामागे अॅलोपथीला जबाबदार धरले होते. यावर देशातल्या अनेक विद्वान डॉक्टरांनी आक्षेप घेतला होता व डॉक्टरांच्या विविध संघटनांनी रामदेव बाबा यांच्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. या याचिकांमध्ये बाबा रामदेव अॅलोपथीच्या विरोधात दुष्प्रचार करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या खटल्यावर सुनावणीदरम्यान डॉक्टरांचे वकील अखिल सिब्बल यांनी कोरोनील हे कोविड-१९ वरचे गुणकारी औषध असल्याचा दावा करण्यात आला होता पण या औषधाला कोणतीही परवानगी नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. रामदेव बाबा यांनी सरकारच्या लसीकरण मोहिमेवरही टीका करत लसीकरणामुळे कोविड-१९ला आळा बसणार नाही, कोरोना थांबवायचा असेल तर आयुर्वेद व योग शिवाय पर्याय नाही अशी विधाने केल्याचे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

त्यावर न्या. भंभानी यांनी आपल्यापुढील खरी चिंता सार्वजनिक असल्याचे सांगितले. आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती व तिची प्रतिष्ठा आपल्याला कलंकित करायची नाही. ही चिकित्सा प्राचीन भारतीय आरोग्य चिकित्सा आहे पण अॅलोपथीच्या विरोधात दिशाभूल करणारी विधाने करू नये, असे आपल्याला वाटते. ही चिकित्सा मान्यता प्राप्त आहे हेही आपल्याला विसरता कामा नये, असे न्या. भंभानी म्हणाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0