‘८ हजार मेगावॉट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवा’

‘८ हजार मेगावॉट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवा’

मुंबई: राज्याला विजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तत्कालिक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, स

द. आफ्रिकेतील कोरोनाचा नवा विषाणू प्रकार धोकादायक
शोपियन एन्काउंटरः लष्करी अधिकाऱ्याविरोधात फिर्याद
किंग कोरोना वि. अमेरिकन स्पिरीट

मुंबई: राज्याला विजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तत्कालिक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावेसध्याची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मेगावट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले.         

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ऊर्जा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी राज्याची सध्याची वीज निर्मितीकोळशाचा साठाविजेची आजची आणि भविष्यातील मागणी आणि या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेतला.

दर आठवड्याला आढावा घेणार

राज्यात मागील पाच दिवसांपासून कोणत्याही स्वरूपाचे भारनियमन करण्यात आले नाही ही चांगली बाब असून अशीच परिस्थिती भविष्यातही कायम राहण्यासाठी वीज निर्मितीकोळसा साठाआयात कोळसावीज खरेदी याचे उत्तम नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेणार असून निर्णयांचा कार्यपूर्ती अहवाल या बैठकीत सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पावसाळ्याचे नियोजन करावे

केंद्र शासनाने १० टक्के कोळसा आयातीला मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया गतीने पूर्णत्वाला न्यावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणालेयेणारा पावसाळा लक्षात घेऊन कोळशाच्या साठ्याचे नियोजन करण्यात यावे. राज्याचा हक्काचा आणि दर्जेदार कोळसा राज्याला नियमितपणे उपलब्ध होईल यादृष्टीने महानिर्मितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. उरण येथीलगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी आपण स्वत: बोलू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही- ऊर्जामंत्री

राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व मागील ५ दिवसांपासून राज्यात कोणत्याही प्रकारचे भारनियमन करण्यात आलेले नसल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. एकट्या महाराष्ट्रातच नाही तर देशात विजेची टंचाई आहे. कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून इतर १२ राज्यातही कोळशामुळे भारनियमन सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्याला होत असलेला अपुरा कोळसा पुरवठा व उन्हाळ्यामुळे मागणी वाढली असल्याने  राज्यात दर दिवशी २ हजार ते २ हजार ५०० मेगावची तूट निर्माण झाली होती. ती दूर करण्यात सध्या विभाग यशस्वी झाला आहे. विभागाने २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याच्या दृष्टीने निविदा काढल्या आहेत. महावितरणच्या स्तरावर आवश्यकतेनुसार ४ लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याचे कार्यादेश दिलेले आहेत. वीज खरेदी करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. राज्यात भारनियमन करावे लागू नये यासाठीचे ऊर्जा विभागाने नियोजन केले आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. नगरविकासग्रामविकास विभागाकडील प्रलंबित वीज देयकांच्या थकबाकीची रक्कम विभागाला मिळावी अशी मागणीही डॉ. राऊत यांनी यावेळी केली. त्यांनी राज्यात येणाऱ्या कोळसा रॅकची संख्या कमी झाल्याने वीज निर्मितीमध्ये कमी आल्याचे सांगितले. कोळसा निर्मिती आणि रॅकचे उत्तम नियोजन होण्याच्या दृष्टीनेही विभाग प्रयत्न करत असल्याचेही डॉ.राऊत म्हणाले.

या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगेमाजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,  महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघलमहानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह विभागाचे इतर अधिकारी  उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0