पश्चिम वाहिन्या नद्यांतील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावेः मुख्यमंत्री

पश्चिम वाहिन्या नद्यांतील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावेः मुख्यमंत्री

मुंबई: वैनगंगा - नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करावा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठ

“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतराः मुख्यमंत्री
जिम कॉर्बेटचे नामांतर रामगंगा नॅशनल पार्क?
शिक्षक भरती घोटाळाः प. बंगालमध्ये मंत्र्याला ईडीकडून अटक

मुंबई: वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करावा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या.

या बैठकीत वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त पाणी नळगंगा खोऱ्यात नेण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पामुळे अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे पावणे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते, अशी माहिती देण्यात आली. अमरावती आणि नागपूर विभागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणे शक्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील १०४ प्रकल्पापैकी दहा ते वीस टक्के प्रकल्प अपूर्ण आहेत. हे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यात यावेत. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, अशा सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.

पश्चिम वाहिनी नद्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. ते गोदावरी नदीत वळवल्यास कोरड्या राहणाऱ्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी हा प्रकल्पही अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे शेतीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले जावे. यासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नद्यांच्या पात्रात गाळ साचला आहे, विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवून नद्यांची वहन क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. यामुळे पूर नियंत्रणासाठी फायदा होईल. जलसंपदा, नगरविकास आणि पर्यावरण विभागाने याबाबत समन्वय ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0