कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी!

कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी!

मुंबईः योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने कोरोना या विषाणूजन्य आजारावर कायमस्वरुपी मात करणारे ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ हे औषध विकसित केल्

रामदेव बाबा यांची दुसऱ्यांदा बनवाबनवी
‘संभ्रम करणारा कोरोना विषाणूचा फोटो त्वरित हटवावा’
तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा

मुंबईः योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने कोरोना या विषाणूजन्य आजारावर कायमस्वरुपी मात करणारे ‘कोरोनील’ व ‘श्वासरी’ हे औषध विकसित केल्याचा दावा केला असला तरी खुद्द या कंपनीने उत्तराखंड सरकारकडे या औषधाच्या परवानगीसाठी जो अर्ज पाठवला होता, त्या अर्जात त्यांनी कोरोना या साथरोगाचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

त्यांनी अर्जात आपले ‘हे रसायन प्रतिकारक शक्ती (इम्युनिटी बूस्टर) वाढवणारे असून ते प्रामुख्याने श्वसन मार्गात जंतू संसर्ग झाल्यास आणि जीवाणू व विषाणूपासून होणार्या सर्व तापांवर गुणकारी असल्याचे नमूद केले होते.

दिव्य फार्मसीचे औषधाची परवानगी मागणारे पत्र.

दिव्य फार्मसीचे औषधाची परवानगी मागणारे पत्र.

म्हणजे कोरोनावरचे औषध शोधल्याचा जो दावा पतंजलीने प्रसार माध्यमाद्वारे केला तो सरकारची व जनतेची दिशाभूल करणारा होता. त्यांनी सरकारकडे सादर केलेली माहिती व प्रत्यक्षात लोकांपुढे दिलेली माहिती यात तफावत असल्याचे दिसून येते.

आणि २४ तासानंतर घडलेही तसेच. बुधवारी उत्तराखंडच्या आयुर्वेदिक व युनानी विभागाचे लायसेंस अधिकारी डॉ. यतेंद्र सिंह रावत यांनी पतंजलीने विकसित केलेले औषध कोरोनावरचे नव्हे तर शरीरात प्रतिकारक शक्ती वाढवणारे, खोकला, तापावरचे असल्याचे स्पष्ट केले. डॉ. रावत म्हणाले, पतंजलीने आम्हाला पाठवलेल्या अर्जात त्यांची ही  औषधे कोरोनावरची आहेत याचा उल्लेख कुठेच केला नव्हता. हे औषध केवळ इम्युनिटी बूस्टर, खोकला व तापावर असल्याने त्याची परवानगी कंपनीने मागितली होती ती आम्ही दिली. पण आता आम्ही कीट बनवण्याची परवानगी कुणी दिली याची नोटीस त्यांना पाठवणार आहोत, असे ते म्हणाले.

दिशाभूल करणारी माहिती

परवाना विभागाचे दिव्य फार्मसीला पाठविण्यात आलेले पत्र.

परवाना विभागाचे दिव्य फार्मसीला पाठविण्यात आलेले पत्र.

कोरोना महासंकट देशापुढे नव्हे तर जगापुढे एवढे आ वासून उभे असताना रामदेव बाबा व त्यांचे सहकारी बालकृष्णन यांनी आपल्या औषधाबद्दल सरकारकडे जी माहिती दिली आहे ती माहिती त्यांनी जनतेपासून लपवून ठेवली.

त्यांनी उत्तराखंड सरकारला पाठवलेल्या पत्रात त्यांचे औषध केवळ कोरोनाच्या विषाणूंवर गुणकारी ठरत नसून ते जीवाणूंमुळे होणार्या अन्य आजारावरही गुणकारी ठरू शकते, असे म्हटले आहे. म्हणजे मानवी आजाराला कारणीभूत ठरणार्या विषाणू व जीवाणूंवर मात करणारी शक्ती त्यांच्या एकाच औषधात असल्याचा त्यांचा दावा आहे.

कोरोना हा विषाणूजन्य आजार असल्याची वैज्ञानिक माहिती आहे व त्या अनुषंगाने जगभर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असताना पतंजलीची ही दोन औषधे कोरोना विषाणूंवर नव्हे तर जीवाणूजन्य आजारांवरही मात करतात असे दोघांचे म्हणणे आहे. म्हणजे पतंजलीचे एक औषध जीवाणू व विषाणूजन्य आजारांवर मात देऊ शकते असा त्याचा निष्कर्ष निघू शकतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0