‘कोविडचा धोका कायम; लसीकरणाचा वेग वाढवा’

‘कोविडचा धोका कायम; लसीकरणाचा वेग वाढवा’

मुंबई: कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, अ

जगात कोरोनाचे रुग्ण ३ लाख, आर्थिक संकटाचे आव्हान
इंटरनेटवर मदत मागण्यांवर गुन्हे नकोः सर्वोच्च न्यायालय
तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा

मुंबई: कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही निर्देश दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे त्यांनी सांगत काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला ८ लाख डोसेस देत होतो, सद्या ५ लाख डोसेस दिवसाला दिले जातात, या कडे लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.

डॉ. व्यास यांनी सांगितले की, ८ डिसेंबर रोजी ६,२०० सक्रिय रुग्ण होते. मात्र आज १० हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या २० दिवसांत सक्रिय रुग्णांत ५० टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट १.०६ टक्के झाल्याचेही ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0