दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष

दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष

नवी दिल्ली : केवळ ५४.६५ टक्के मतदान होऊनही दिल्लीत केजरीवाल यांची आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्ता राखेल असा निष्कर्ष सर्वच जनमत चाचण्यांनी जाहीर केला

‘भ्रष्टाचाराच्या तक्रारीसाठी मला थेट कॉल करा’
भाजपची घोडदौड कायम; आप दाखवू शकतो विरोधीपक्षांना मार्ग
जहांगिरपुरी दंगलीमागे भाजपचः आपचा आरोप

नवी दिल्ली : केवळ ५४.६५ टक्के मतदान होऊनही दिल्लीत केजरीवाल यांची आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्ता राखेल असा निष्कर्ष सर्वच जनमत चाचण्यांनी जाहीर केला आहे.

एनडीटीव्हीच्या पोल ऑफ एक्झिट पोलने आपला ५२ जागा, भाजपला १७ जागा व काँग्रेसला १ जागा दिली आहे. तर टाइम्स नाऊने आपला ४४, भाजपला २६ जागा दिल्या आहेत. टीव्ही-९ भारतवर्ष-सिसेरोने आपला ५४ व भाजपला १५ जागा तर सुदर्शन न्यूजने आपला ४०-४५ व भाजपला २४-२८ जागा दिल्या आहेत.

रिपब्लिक टीव्हीने आपला ४८-६१ तर भाजपला ९-२१ जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.

२०१५साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून इतिहास रचला होता. हा इतिहास सध्याचे जनमत चाचण्यांचे निष्कर्ष पाहता पुन्हा रचला जाणार नाही असे वाटते. पण केजरीवाल यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार नाही असेही या जनमत चाचण्यांवरून स्पष्टपणे दिसते.

अण्णा हजारे व केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता. या पक्षाने २०१३मध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी या पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या ८ आमदारांच्या विनाशर्त पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते पण हे सरकार फार काळ चालले नाही. त्यानंतर २०१५मध्ये पुन्हा निवडणुका होऊन केजरीवाल यांनी दणदणीत बहुमत मिळवले होते. २०१३च्या निवडणुकांत भाजपला ३२ जागा मिळाल्या होत्या पण त्यांना सरकार स्थापन करता आले नव्हते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: