ग्राम पंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला

ग्राम पंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला

मुंबईः कोरोनाची परिस्थिती उद्भवल्याने एप्रिल ते जून २० या काळात लांबणीवर पडलेल्या व आता डिसेंबर अखेर मुदत संपणार्या राज्यातल्या ३४ जिल्ह्यांतील १४,२३४

टीआरपी घोटाळाः १४०० पानांचे आरोपपत्र
इराणींच्या कंपनीचा पत्ता, जीएसटी क्रमांक वादग्रस्त गोवा रेस्टॉरंटचाच
माहिती-आकडेवारी जाहीर करा – २०० अर्थतज्ज्ञांची मागणी

मुंबईः कोरोनाची परिस्थिती उद्भवल्याने एप्रिल ते जून २० या काळात लांबणीवर पडलेल्या व आता डिसेंबर अखेर मुदत संपणार्या राज्यातल्या ३४ जिल्ह्यांतील १४,२३४ ग्राम पंचायतींच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी घेण्यात येणार असून १८ जानेवारीला मतमोजणी केली जाईल, तर २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल केले जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी स्पष्ट केले. या घोषणेमुळे शुक्रवारपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांत आपला वरचष्मा ठेवण्यासाठी राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी झुंज दिसण्याची शक्यता आहे.

नामनिर्देशनपत्रे ३० डिसेंबरपर्यंत –
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.

२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य
विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या-
ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२. एकूण- १४, हजार २३४

निवडणूक कार्यक्रम 
निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध : १५ डिसेंबर २०२०
उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर २०२० (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२०
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ जानेवारी २०२१
मतदान : १५ जानेवारी २०२१ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
मतमोजणी : १८ जानेवारी २०२१

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: