‘ड्रग तस्कराला सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव’

‘ड्रग तस्कराला सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दबाव’

नवी दिल्लीः अंमली पदार्थाच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवरील गुन्हे मागे घ्यावेत म्हणून मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह व राज्य भाजपाती

कार्डेलिया क्रूझ प्रकरणी आर्यन खान व ५ जणांना क्लिन चीट
गर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस
‘ड्रग्ज बाळगणाऱ्यांचे, व्यसनींचे पुनर्वसन हवे, जेल नको’

नवी दिल्लीः अंमली पदार्थाच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवरील गुन्हे मागे घ्यावेत म्हणून मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह व राज्य भाजपातील एक ज्येष्ठ नेते यांनी दबाव आणल्याचा आरोप नार्कोटिक्स अँड अफेअर्स ऑफ बॉर्डर ब्युरो (एनएबी)मधील अतिरिक्त पोलिस अधिक्षक थोऊनाओजम वृंदा यांनी केला आहे.

वृंदा यांनी या संदर्भातील आपले म्हणणे इंफाळ उच्च न्यायालयात १३ जुलै रोजी मांडले आहे.

जून २०१८मध्ये वृंदा यांनी अंमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश केला होता. त्यांनी सुमारे २८ कोटी रु. किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले होते. या तस्करीतील प्रमुख आरोपीचे नावे लुखाऊसी जू हे असून तो मणिपूर अमली पदार्थ तस्करीतील मोठा गुन्हेगार आहे. त्याच्या घरातही अंमली पदार्थ सापडले. तो चंदेल जिल्ह्यात भाजपचे कामही करतो. जूचे राजकीय नेत्यांशी संबंध असतानाही त्याला अटक झाल्याने मोरेह या शहरात खळबळ उडाली होती. त्याला अटक झाली तेव्हा तो चंदेल जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. त्याला अटक केल्यानंतर लगेचच त्याच्या सुटकेसाठी राजकीय दबाव वाढत गेला.

अखेर मार्च २०१९मध्ये जूला जामीन मिळाला पण तो म्यानमारमध्ये पळून गेला. मात्र गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याने आत्मसमर्पण केले. त्याच्या जामीनावर इंफाळ उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाने सांगितले की, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाहीत तोपर्यंत ते निर्दोष असतात.

न्यायाधीशाच्या या टिपण्णीवर वृंदा यांनी गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे तक्रार केली होती. त्यांनी सोशल मीडियात न्यायाधीशांवर टीकाही केली होती. त्यानंतर वृंदा यांना अवमान केल्याची नोटीस पाठवण्यात आली. त्यावर १३ जुलै रोजी त्यांनी उत्तर दिले.

वृंदा या २०१२मध्ये मणिपूर पोलिस सेवेत रुजू झाल्या होत्या आणि २०१८मध्ये त्या एनएबीची सूत्रे घेतली होती. त्यांना या पूर्वी मणिपूर सरकारने अंमली पदार्थाची तस्करी रोखल्याबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या पूर्वी एनएबीच्या पथकाने १०० कोटी रु. हून अधिक अमली पदार्थ ताब्यात घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी या पथकाला १० लाख रु.चे बक्षिस दिले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: