सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी

सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी

मुंबई: राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्

कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द
मोदींना उशीरा सुचलेले शहाणपण
या वर्षात एड्स, मलेरियापेक्षा कोविडचे मृत्यू अधिक

मुंबई: राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा ५० केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्यावतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा ५० करण्यात आली आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबर २०२१च्या रात्री १२:०० वाजेपासून अंमलात येणार आहे. परिपत्रकात असे ही नमूद करण्यात आले आहे कीअंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता २० असेल. त्याच प्रमाणे राज्यातील पर्यटक स्थळेसमुद्रकिनारपट्टीक्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकृष्ट करणाऱ्या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास२४ डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेल्या सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) १४४ सीआरपीसी लागू करता येईल. या शिवाय आदींच्या आदेशाप्रमाणे लागू सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0