पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला – शरद पवार

पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला – शरद पवार

ज्या पुस्तकाचा संदर्भ देत कार्यकर्त्यांवर कारवाई केली, तशी नक्षलवादाशी संबंधीत पुस्तके माझ्याही घरात असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले.

भीमा कोरेगाव : जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले
विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे हेनी बाबू यांना समर्थन
भीमा-कोरेगांव दंगल खटल्यातून संभाजी भिडेंचे नाव वगळले

एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असून, त्याची विशेष समिती नेमून चौकशी झाली पाहिजे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

३१ डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यामध्ये एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे दंगल झाली होती. दंगलीसाठी एल्गार परिषदेला जबाबदार धरण्यात आले होते. तसेच दंगलींचा संदर्भ देऊन देशभरातील अनेक लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांवर, मानवी हक्क चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांचा नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे.

शरद पवार यांनी या कारवाईबद्दलच शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “एल्गार परिषदेत दडपशाहीविरोधात आवाज उठवला गेला होता. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या गेल्या. विद्रोही विचारांच्या कविता वाचणे किंवा घरात नक्षलवादी साहित्य असणे, हा काही अटकेचा आधार होऊ शकत नाही. माझ्याही घरात नक्षलावादाशी संबंधित साहित्य आहे. आम्हीही माहिती घेत असतो. वाचन करणाऱ्यांकडे अशी पुस्तके असतातच. याचा अर्थ ते नक्षलवादी आहेत असा होत नाही,”.

पवार म्हणाले, की लोकशाहीत तीव्र भावना मांडल्या जातात. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तसे झाले होते. मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचा खटला टाकला नव्हता.

“एल्गार परिषद अटक प्रकरणात सत्तेचा पूर्णपणे गैरवापर झाला आहे. दलितांसाठी काम करणाऱ्यांवर कारवाई केली गेली’, असे म्हणत शरद पवार यांनी पोलीस कारवाई झालेल्या कार्यकर्त्यांची नावेच वाचून दाखवली. सुधा भारद्वाज, सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव, कॉ. सुधीर ढवळे, शोमा सेन, महेश राऊत  हे सगळे लोक दलित, शोषितांसाठी काम करतात. त्यांच्यावर कारवाई केली गेली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणली. पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह होते. पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सहकार्यांनी सत्तेचा गैरवापर केला.

आजी किंवा माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांना भेटून मी तशी विनंती करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

आहे. केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. तशी पुस्तकं माझ्याही घरात आहेत. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं आहे. पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचं स्पष्ट दिसतं आहे,’ असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0