निवासी, आश्रमशाळाही आजपासून सुरू

निवासी, आश्रमशाळाही आजपासून सुरू

मुंबई: बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरू असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मु

५ लाख आयसीयू बेड, दीड लाख डॉक्टर, २ लाख नर्सची गरज
कोरोना निर्बंध शिथील; धार्मिक स्थळे, सिनेमागृहे बंदच
कोरोना : असंघटित क्षेत्राला वाचवण्याची नितांत गरज

मुंबई: बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरू असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलीसाठी चालविल्या जाणाऱ्या निवासी अनिवासी आश्रमशाळांमधील ग्रामीण भागातील इयत्ता ५वी ते १२वीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८वी ते १२वीचे वर्ग असलेल्या आश्रमशाळा १ डिसेंबर रोजी सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व शहरी भागातील महापालिका हदीतील इयत्ता चौथीचे वर्ग असलेल्या शाळा ०१ डिसेंबर, २०२१ पासून सुरू करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.

त्यास अनुसरून या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आश्रमशाळा तसेच (वसतीगृहासह) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवासी व अनिवासी आश्रमशाळांनी, कार्यवाही करावी, अशा सूचनाही वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: