‘तुकडे तुकडे गँग कोण आहे?’

‘तुकडे तुकडे गँग कोण आहे?’

तुकडे तुकडे गँग नेमकी कोणती गँग आहे? त्याची माहिती द्यावी, अशी माहिती साकेत गोखले, यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मागितली आहे.

अमित शहांच्या मतदारसंघात ‘कलम ३७०’ क्रिकेट स्पर्धा
जेएनयू साबरमती हॉस्टेलच्या वॉर्डनचा राजीनामा
३७० कलम रद्द करण्याचा संसदेत प्रस्ताव

मुंबई – तुकडे तुकडे गँग नेमकी कोणती गँग आहे? त्याची नेमकी माहिती द्यावी, असा अर्जच माहितीच्या अधिकारामध्ये मुंबईतील कार्यकर्ते साकेत गोखले, यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केला आहे.

मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली तुकडे तुकडे गँग हिंसा पसरवीत असल्याचा आरोप करून त्याना शिक्षा देण्याची वेळ आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संध्याकाळी गोखले यांनी माहिती अधिकारामध्ये माहिती मागविणारा अर्ज केला.

तुकडे तुकडे गँग कशी ओळखता येते. या तुकडे तुकडे गँगवर कारवाई करण्यासाठी काही ठरलेली प्रक्रिया आहे का. गृहमंत्र्यांनी मारलेले शेरे, हे पोलीस अथवा संबंधीत यंत्रणेच्या माहितीवर आधारीत आहेत का. नेमक्या कोणत्या कायद्यान्वये मंत्री तुकडे तुकडे गँगला शिक्षा करणार आहेत, असे प्रश्न गोखले यांनी केलेल्या अर्जामध्ये विचारले आहेत.

दिल्ली विकास प्राधिकरणा(डीडीए)तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमित शहा म्हणाले, की दिल्लीत अशांतता आणि हिंसा पसरविण्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली तुकडे तुकडे गँग जबाबदार आहे. आता वेळ आली आहे, की दिल्लीतील जनतेने त्याना शिक्षा दिली पाहिजे.

वादग्रस्त नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याबाबत काँग्रेस लोकांची दिशाभूल करीत आहे. या कायद्यावर संसदेमध्ये चर्चा झाली, पण त्यावेळी कोणताही पक्ष काहीच बोलले नाही, पण ते बाहेर येऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

१५ डिसेंबरला दक्षिण दिल्लीतील निदर्शने झाल्यानंतर पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. २० डिसेंबरला दरियागंज येथे हिंसक निदर्शने झाली होती.

गोखले यांनी म्हंटले आहे, की मला आशा आहे, की ते आता असे म्हणणार नाहीत, की हा एक निवडणूक जुमला होता. तसे झाले, तर ती अतिशय मानहानीकारक गोष्ट असेल.

गुजरातमध्ये निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान गुजरातमधील निवडणुकीत हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही गोखले यांनी माहिती अधिकारात त्या आरोपाला पुष्टी देणारी कोणती माहिती आहे, याची माहिती मागवली होती. त्यावर अनौपचारिक माहितीवर आधारीत आरोप असल्याचे उत्तर त्याना मिळाले होते. नंतर अरुण जेटली यांनी या विषयावर संसदेमध्ये माफी मागितली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: