‘पुरामुळे नुकसान रोखण्यासाठी कठोर निर्णय हवेत’

‘पुरामुळे नुकसान रोखण्यासाठी कठोर निर्णय हवेत’

कोल्हापूर: पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर राज्यशासनाचा भर राहील, असे सांग

‘राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी उपाययोजना’
मराठा आंदोलन करू नका, समन्वयासाठी समिती नेमा – मुख्यमंत्री
आंध्र सरकारची सिमेंट खरेदी मुख्यमंत्र्याच्या कंपनीकडून

कोल्हापूर: पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर राज्यशासनाचा भर राहील, असे सांगून भविष्यात पूरपरिस्थितीत नागरिकांचे नुकसान होवू नये, यासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, शिरोळ, शाहूपुरी, पंचगंगा हॉस्पिटल, शिवाजी पूल आदी ठिकाणच्या पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यानंतर पूर परिस्थितीबाबत सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कोल्हापूर, सांगलीसह अन्य काही जिल्ह्यांवर अतिवृष्टीमुळे पुराचे संकट ओढावले. नदी, नाले, ओढ्यांवर नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ही स्थिती उद्भवते आहे. रेड -ब्ल्यूलाईनमध्ये झालेल्या बांधकामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात अशा बांधकामांना परवानगी देवू नये, या भागात झालेली अतिक्रमणे काढावीत, अशा सक्त सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

पुरामुळे झालेली हानी, ‘मी पाहतो आहे, यातून नक्कीच मार्ग काढण्यात येईल. स्थलांतर करून प्रशासनाने लाखो नागरिकांचे प्राण वाचविल्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद. कोविड, पूर व पुराच्या अनुषंगाने झालेले नुकसान व पुरामुळे रोगराई रोखण्याचे राज्यापुढील प्रमुख आव्हान असून राज्य सरकार याचा धैर्याने मुकाबला करेल. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना आधार देण्याचं काम राज्यशासनाने केले आहे. पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा आढावा घेवून राज्य शासन पूरग्रस्तांना भरीव मदत करेल, यासाठी केंद्राकडे ही आर्थिक मदत मागितली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील पशुधन जगविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या चार साखर कारखान्यांच्या कामाचे कौतुक करून उर्वरित साखर कारखान्यांनी या कामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर पुरामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी उड्डाणपुलांचे नियोजन करावे लागेल. खरडून गेलेल्या शेतीचे व पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत, या कामी आवश्यक त्या ठिकाणी पंचनाम्यांसाठी ड्रोनचा वापर करावा. कोल्हापूर शहर सुधारणेच्या दृष्टीने महानगरपालिकेला आवश्यक निधी राज्यशासन देईल, मात्र त्याचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा, अशी सूचना त्यांनी केली.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने यावे. या भीषण पूर परिस्थितीत केंद्राने राज्याला मदत करावी. आपत्तीत झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडे ज्यादा मदत मागण्यास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पूरपरिस्थितीत मानवतेच्या भावनेतून कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे मुश्रीफ यांनी आभार मानले.

‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित शहर व ग्रामीण भागाची पाहणी करण्यासाठी वेळ दिला, याबद्दल तमाम कोल्हापूरकरांच्या वतीने आभार अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी आभार मानले.

कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूर बाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

यावेळी पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

नागरिकांनो! घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात उद्धव ठाकरे यांनी शाहुपूरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित रहिवाशांशी संवाद साधला.

यावेळी स्थानिक रहिवासी पूजा नाईकनवरे यांनी आणि गणेश पाटील यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: