आज प्रेम आणि एकता धर्मांधता आणि फासीवादासमोर छातीठोकपणे उभे राहिले आहेत.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हजारो नागरिक एकत्र येत आहेत, दंडुकेशाही करणाऱ्या पोलिसांच्या नजरेला नजर भिडवत आहेत. जनतेच्या या हिंमतीला दाद देत अरुंधती रॉय यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे:
“भारत जागा झाला आहे. हे सरकार आता उघडे पडले आहे, त्याची नाचक्की होत आहे. आज प्रेम आणि एकता धर्मांधता आणि फासीवादासमोर छातीठोकपणे उभे राहिले आहेत. घटनाद्रोही CRB आणि NRC च्या विरोधातील निदर्शनांमध्ये सर्वजण सामील झाले आहेत. आम्ही दलित आहोत, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, शीख, आदिवासी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, शेतकरी, कामगार, अभ्यासक, लेखक, कवी, चित्रकार आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही या देशाचे भविष्य आहोत.
आता तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही.”
अरुंधती रॉय
१९ डिसेंबर
COMMENTS