फडणविसांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध – मलिक

फडणविसांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध – मलिक

अंडरवर्ल्डशी देवेंद्र फडणवीस यांचे थेट संबंध असून, बनावट नोटा प्रकरणात त्यांनी गुंडांना वाचवले आणि हे सगळे समीर वानखेडे यांच्या मार्फत केल्याचे आरोप आज नवाब मलिक यांनी केले.

खेल अब शुरू हुआ हैं!
फडणवीस ठाम असल्याने ‘आरे वाचवा’ आंदोलन पुन्हा पेटणार
फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत प्रसार भारती अंधारात

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नावब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड आणि गुंडांशी संबंध असल्याचे नवे आरोप केले.

अंडरवर्ल्डच्या लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले?  मुन्ना यादव नावाचा नागपूरकहा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि फडणवीस यांचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही. हैदर आजम नावाच्या एका नेत्याला मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवले होते की नाही. हैदर आजम बांग्लादेशातल्या लोकांना मुंबईत आणण्याचे काम करत होता. हैदर आजमची दुसरी पत्नी बांग्लादेशी आहे. या प्रकरणाची चौकशी मालाड पोलिसांनी केली होती. पोलीस तपास सुरू झाल्यावर तो तेंव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून दाबण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला.

मलिक यांनी फडणवीस यांना सवाल विचारला, “तुमच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रात वसुली होत होती की नाही. मुंबईच्या बिल्डरांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करुन वसुली केली जात होती की नाही. जमिनींच्या मालकांना पकडून आणून, त्या आपल्या नावावर केल्या जात होत्या की नाही. तुमच्या कार्यकाळात परदेशातू कुख्यात गुंड फोन करायचे, की नाही.”

मलिक यांनी आरोप केला, की ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली तेव्हा देशभरात बनावट नोटा  पकडल्या जावू लागल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात खोट्या नोटांचे एकही प्रकरण समोर आले नाही. कारण देवेंद्र फडणवीसांच्या संरक्षणात बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसी (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स)मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा टाकला. त्यात १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटा आयएसआय पाकिस्तानकडून बांग्लादेशमार्गे संपूर्ण भारतात पसरवल्या जातात. या प्रकरणी मुंबई आणि पुण्यात दोघांना अटक झाली. पुण्यात इम्रान आलम शेख याला अटक करण्यात आली. पण १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या ऐवजी ८ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. आरोपीला काही दिवसांनी जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात का आले नाही. ”

नवाब मलिक म्हणाले, “बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्या लोकांना तत्कालीन सरकारचे संरक्षण होते. तो काँग्रेसचा नेता असल्याचा असल्याचे सांगण्यात आले. इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अराफत शेखला देवेंद्र फडणवीसांनी भाजपामध्ये आणून अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात गुंड मुन्ना यादवला अध्यक्ष बनवता, बांग्लादेशातील लोकांना मुंबईत स्थायिक करण्याचे काम करणाऱ्याला तुम्ही अल्पसंख्याक मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवता. तुम्ही पूर्णपणे राजकारणात गुन्हेगारांचा वापर केला. रियाज भाटी कोण आहे ते देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. “

“रियाज भाटी २९ ऑक्टोबर रोजी सहार एअरपोर्टवर खोट्या पासपोर्टसह पकडला गेला. ज्याचे संबंध अंडरवर्ल्ड आणि दाऊद बरोबर होते. रियाज भाटी वारंवार फडणवीस यांच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतही रियाज भाटीने फोटो काढले. प्रचंड सुरक्षा असतानाही रियाज भाटी पंतप्रधानांतपर्यत कसा पोहोचला.” असा प्रश्न विचारत मलिक म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले, खोट्या नोटांचे नेक्सस चालवले. रियाज भाटीच्या माध्यमातून वसुली केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0