दिवस-रात्रीही तिरंगा फडकवण्याची परवानगी

दिवस-रात्रीही तिरंगा फडकवण्याची परवानगी

नवी दिल्लीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारने राष्ट्रीय ध्वज संहितेत महत्त्वपूर्ण बदल केला असून आता राष्ट्रीय ध्वज तिरंगा दिव

जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला, ६ वर्षांतला नीचांक
काँग्रेस जाहीरनामा : कर्जमाफी, अनु.जाती-जमातींना मोफत शिक्षणाचे आश्वासन
नागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय? – भाग २

नवी दिल्लीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारने राष्ट्रीय ध्वज संहितेत महत्त्वपूर्ण बदल केला असून आता राष्ट्रीय ध्वज तिरंगा दिवसा व रात्रीही फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय ध्वज सूर्यादय ते सूर्यास्त या काळातच फडकवण्यात यावा असा नियम होता.

सरकारने राष्ट्रीय ध्वज पॉलिएस्टर व मशीनने तयार केला असल्यास तसाही वापरण्यास परवानगी दिली आहे. या पूर्वी राष्ट्रीय ध्वज खादीचा असावा असा नियम होता.

स्वातंत्र्याला अमृतमहोत्सव पूर्ण होत असल्याने सरकारने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट य दरम्यान प्रत्येक घरी तिरंगा (हर घर तिरंगा) हा देशव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशप्रेमाचा उत्साह निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

सरकारने राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या नियमात व संहितेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार आता कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवला जाऊ शकतो. तसेच कोणीही नागरिक आपल्या घरामध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0