गोगोईंविरोधात हक्कभंगाच्या १० तक्रारी दाखल

गोगोईंविरोधात हक्कभंगाच्या १० तक्रारी दाखल

नवी दिल्लीः माझ्या मनात येईल तेव्हा मी संसदेत जाईन, हे वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यसभा सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात राज्यसभेतल्य

देश कठीण परिस्थितीतून जातोय – सरन्यायाधीश
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक घेणे नाकारले
गोगोई यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

नवी दिल्लीः माझ्या मनात येईल तेव्हा मी संसदेत जाईन, हे वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यसभा सदस्य व माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात राज्यसभेतल्या अनेक पक्षांच्या सदस्यांनी हक्कभंगाच्या तक्रारी सभापतींकडे पाठवल्या आहेत. गोगोई यांच्याविरोधात अशा १० तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे जवाहर सिरकार व मौसम नुरी या दोघांनी हक्कभंगाची नोटीस राज्यसभा सभापतींकडे दाखल केली होती. गोगोई यांचे विधान राज्यसभेचा अवमान असून त्यामुळे हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आल्याचे जवाहर सिरकार व मौसम नुरी या दोघांचे म्हणणे होते. त्यानंतर बुधवारी काँग्रेस, माकप, समाजवादी पार्टी, शिवसेना व इंडियन मुस्लिम लीगच्या सदस्यांनी राज्यसभा कार्यालयाकडे पाठवण्यात आली.

एखाद्या खासदाराने संसदेच्या दोन्ही सभागृहांची प्रतिष्ठा कमी होईल अथवा तिचा अवमान होईल असे कृत्य वा विधान केल्यास त्याच्याविरोधात हक्कभंगाची तक्रार दाखल करता येते. या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित सदस्यास संसद शिक्षा सुनावते.

गेल्या आठवड्यात गोगोई यांनी एनडीटीव्हीचे पत्रकार श्रीनिवासन जैन यांना दिलेल्या एका मुलाखतीत स्वैर विधाने केली होती. गोगोई राज्यसभेचे सदस्य झाल्यापासून ६८ बैठकांपैकी केवळ ६ बैठकांना उपस्थित राहिले होते, त्यांच्या इतक्या गैरहजेरीबाबत श्रीनिवासन जैन यांनी विचारणा केली असता, गोगोई यांनी आपली राज्यसभेतील गैरहजेरी मान्य केली पण ती मान्य करताना त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण सांगितले. कोविड-१९च्या नियमावलींमुळे व डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आपण अनेक दिवस गैरहजर राहिल्याचे त्यांचे म्हणणे होते.

गोगोई पुढे म्हणाले संसदेत कोविड-१९ची नियमावली फारशी पाळली जात नव्हती. सदस्यांच्या बैठकीचे स्थानाबाबतही गैरसोय केली जात होती. ती आपल्याला योग्य वाटली नाही. मला जेव्हा राज्यसभेत जायचे वाटेल तेव्हा मी जाईन. हा काही महत्त्वाचा मुद्दा नाही. मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही की पक्षाने व्हीप काढला तर मला तेथे उपस्थित राहावे लागते. मी राष्ट्रपती नियुक्त सदस्य असून मी स्वतंत्र आहे. मला हवे तेव्हा मी तिथे उपस्थित राहीन, असे गोगोई म्हणाले होते.

गोगोई यांना सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर ४ महिन्यात राज्यसभा सदस्य झाल्याबद्दल विचारले असताना त्यांनी वादग्रस्त मत व्यक्त केले. राज्यसभेत असे काय वेगळे ठेवले आहे? मी ट्रायब्यूनल सदस्य असतो तर तेथे मला पगार, भत्ते राज्यसभेच्या सदस्यापेक्षा अधिक मिळाले असते. मी राज्यसभेतून एकही पैसा घेत नाही, असे एक विधान केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0