राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेस आमंत्रण देऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी

तेलतुंबडेंच्या बचावासाठी उभे राहणे अत्यावश्यक का आहे?
अखेर वरावरा राव यांच्यावर नानावटीत उपचार
‘पत्नीच्या इच्छेविरुद्ध, बळजबरीचे शारीरिक संबंध बलात्कार नाही’

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेस आमंत्रण देऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचा शपथविधी केल्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

राज्यपालांनी सापत्नभावाची वागणूक दिली असा या तिन्ही पक्षांचा आरोप असून राज्यपाल म्हणून कोश्यारी यांनी राज्यघटनेची प्रतिष्ठा कमी केली व भाजपचे प्यादे म्हणून काम केले असा आरोप शिवसेनेने या याचिकेत करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस या तिघांकडे किमान १४५ आमदारांचे पाठबळ आहे. आमचे सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना भाजपला सत्तास्थापनेसाठी पाचारण करणे हे घटनाबाह्य व बेकायदा असून राज्यविधिमंडळाचे विशेष अधिवेशन २४ नोव्हेंबरला घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत अशीही या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका शनिवारी रात्री त्वरित सुनावणीस घ्यावी अशीही या तीन पक्षांनी विनंती केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0