‘नोटबंदीमुळेच वाढले बेरोजगारीचे संकट’

‘नोटबंदीमुळेच वाढले बेरोजगारीचे संकट’

तिरुवनंतपुरमः २०१६मध्ये कोणताही विचार न करता व धोके लक्षात न घेता जनतेवर लादलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची

मंदीवर डॉ. मनमोहन सिंग यांचे पाच उपाय
आश्चर्य जनतेच्या कौलाचे नव्हे, न्यायालयीन कौलाचे वाटायला हवे !
डॉ. मनमोहनसिंग : दुष्प्रचाराचा बळी ठरलेला पंतप्रधान

तिरुवनंतपुरमः २०१६मध्ये कोणताही विचार न करता व धोके लक्षात न घेता जनतेवर लादलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी मोदी सरकारवर केली. डॉ. सिंग यांनी केंद्र व राज्य यांच्यात संवादही नसल्याची खंत बोलून दाखवली. केरळमधील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलमेंट स्टडीज या संस्थेच्या ‘प्रतिक्षा २०३०’कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. सिंग म्हणाले, २०१६मध्ये कोणताही सारासार विचार न करता व धोक्यांची कल्पना न करता मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेत असंघटित क्षेत्राला जबर धक्का दिला. या धक्क्यातून हे क्षेत्र अद्याप सावरलेले नसून बेरोजगारीचा हा वाढलेला दर नोटबंदी निर्णयाची निष्पत्ती आहे. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकांचे पतधोरण समस्यांचे असून त्याचा फायदा लघु व मध्यम क्षेत्राला मिळत नसल्याचेही ते म्हणाले.

संघराज्य प्रणाली व राज्यांशी सततचा संवाद हा भारताच्या घटनेत नमूद करण्यात आला आहे. ही मूल्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा व राजकीय तत्वज्ञानाचा पाया आहे. सध्याच्या सरकारला राज्यांशी संवाद साधण्यात फारसे स्वारस्य वाटत नाही, अशी खंत डॉ. सिंग यांनी व्यक्त केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: