२७१ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान

२७१ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान

मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा स

१८ वर्षांवरील सर्वांना आता कोविड-१९ची लस
फिल्म्स डिव्हिजन स्वतंत्रच हवे!
२० तब्लीगी परदेशी नागरिकांची निर्दोष सुटका

मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ६२ तालुक्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक  आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: नाशिक: बागलाण- १३, निफाड- १, सिन्नर- २, येवला- ४, चांदवड- १, देवळा- १३ आणि नांदगाव- ६. धुळे: धुळे- २, साक्री- ४९ आणि शिंदखेडा- १. जळगाव: रावेर- १२, अमळनेर- १, एरंडोल- २, पारोळा- ३ आणि चाळीसगाव- ६. अहमदनगर: अहमदनगर- ३, श्रीगोंदा- २, कर्जत- ३,  शेवगाव- १, राहुरी- ३ आणि संगमनेर- ३. पुणे: हवेली- ५, शिरुर- ६, बारामती- २, इंदापूर- ४ आणि पुरंदर- २. सोलापूर: सोलापूर- २, बार्शी- २, अक्कलकोट- २, मोहोळ- २, माढा- २,  करमाळा- ८, पंढरपूर- २, माळशिरस- १ आणि मंगळवेढा- ४. सातारा: कराड- ९ आणि फलटण- १.

सांगली: तासगाव- १. औरंगाबाद: औरंगाबाद- १, पैठण- ७, गंगापूर- २, वैजापूर- २, खुलताबाद- १, सिल्लोड- ३, जालना- ६, परतूर- १, बदनापूर- १९ आणि मंठा- २. बीड: बीड- ३, गेवराई- ५ आणि अंबेजोगाई- ५. लातूर: रेणापूर- ४, देवणी- १ आणि शिरूर अनंतपाळ- ४. उस्मानाबाद: तुळजापूर- २, कळंब- १, उमरगा- ५, लोहारा- २ आणि वाशी- १. परभणी: सेलू- ३. बुलढाणा: खामगाव- २ आणि मलकापूर- ३.  एकूण- २७१.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: