‘पिंजरा तोड’च्या २ विद्यार्थीनींना जामीन

‘पिंजरा तोड’च्या २ विद्यार्थीनींना जामीन

नवी दिल्ली : एनआरसी व नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘पिंजरा तोड’ या चळवळीच्या माध्यमातून सरकारविरोधात निदर्शन करणार्या जेएनयूच्या दोन विद्यार्थीनी

राजकीय रंग दिलेले मुर्शिदाबाद तिहेरी हत्या प्रकरण
सीआरपीएफचा गोळीबार हे हत्याकांडः ममतांचा आरोप
भाजपची घोडदौड कायम; आप दाखवू शकतो विरोधीपक्षांना मार्ग

नवी दिल्ली : एनआरसी व नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘पिंजरा तोड’ या चळवळीच्या माध्यमातून सरकारविरोधात निदर्शन करणार्या जेएनयूच्या दोन विद्यार्थीनी देवांगना कलिता (३०) व नताशा नरवाल (३२) यांना रविवारी दिल्लीतील एक न्यायालयाने जामीन दिला. पण दिल्ली पोलिसांनी या दोघींच्या विरोधात हत्या, हत्याचे प्रयत्न, दंगल व गुन्हेगारीचा कट असे अन्य आरोप ठेवत पुन्हा त्यांना अटक केली आणि न्यायालयाकडे १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली. पण न्यायालयाने या विद्यार्थीनींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

२२ व २३ फेब्रुवारी रोजी जाफराबाद मेट्रो स्टेशनवर सीएएविरोधात निदर्शने झाली होती व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सुमारे ५०० आंदोलक उपस्थित होते. यातील बहुतांश आंदोलक महिला होत्या. त्यात देवांगना व नताशा उपस्थित होत्या.

जाफराबाद येथील या आंदोलनावरूनच भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी रोजी धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केले होते. जाफराबादमध्ये ठिय्या मारून बसलेले सीएएविरोधक तीन दिवसात येथून हटले नाही तर आम्ही या आंदोलकांकडे पाहून घेऊ असा इशारा त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला होता आणि त्याच्या दुसर्या दिवशी ईशान्य दिल्लीत दंगल पेटली होती, ज्यात ५२ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता व शेकडो लोक जखमी झाले होते.

दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात देवांगना कलिता (३०) व नताशा नरवाल (३२) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आयपीसी कलम ३५३ लावले होते. या कलमात सरकारी कामात व्यत्यय आणणे व या कर्मचार्यांवर बळाचा प्रयोग करणे अशा तरतूदी आहेत.

जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने हाती आलेल्या पुराव्यानुसार या दोन विद्यार्थीनी जाफराबाद मेट्रो स्टेशनवर सीएए व एनआरसीविरोधात निदर्शन करण्यासाठी उपस्थित होत्या व त्यांनी पोलिस जो दावा करत आहेत, असा कोणताही विरोध पोलिसांना केलेला नाही किंवा या दोघींनी कोणतीही हिंसा केलेली दिसून आलेली नाही. या विद्यार्थीनींचा उद्देश हा केवळ आंदोलनाचा व विरोधाचा होता. या दोघी विद्यार्थीनींचा सामाजिक वावर अत्यंत चांगला असून त्या उच्चशिक्षित आहे, त्या पोलिसांना सहकार्य करण्यासही तयार आहेत, असे न्यायालयाने सांगितले.

पण जामीन मिळताच दिल्ली पोलिसांनी या दोघींवर हत्या, हत्येचा प्रयत्न व गुन्हेगारीचा कट असे आरोप ठेवून त्यांना परत दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याची न्यायालयाकडून परवानगी घेतली.

नताशा नरवाल व देवांगना कलिता या जेएनयूच्या विद्यार्थीनी असून नताशा सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीजमध्ये पीएचडी स्नातक असून देवांगना सेंटर फॉप वुमेन स्टडिजच्या एम.फील स्नातक आहेत.

या दोघी ‘पिंजरा तोड’ या सामाजिक चळवळीच्या संस्थापक सदस्य असून  त्यांनी २०१५मध्ये ही महिला संघटना स्थापन केली होती. जेएनयूमध्ये वसतीगृहात राहणार्या विद्यार्थ्यांवर सतत लावली जाणारी बंधने, स्त्री-पुरुष असा भेदभाव ठेवणारे कायदे-नियम व कर्फ्यू टाइमच्याविरोधात या संघटनेने आंदोलने केलेली आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: