ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे ७८ टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे ७८ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध १५ जिल्ह्यांमधील ६२ तालुक्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार गुरुवारी सरासरी सुमारे ७८ टक्

व्हिलेज डायरी भाग ७ : आणि न्याय
लोक आपला कौल मागे घेतात तेव्हा
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई : राज्यातील विविध १५ जिल्ह्यांमधील ६२ तालुक्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार गुरुवारी सरासरी सुमारे ७८ टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची २९ जून २०२२ रोजी घोषणा केली होती. त्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात २३८ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: नाशिक- ३६, धुळे- ४१, जळगाव- २०, अहमदनगर- १३, पुणे- १७, सोलापूर- २५, सातारा- ७, सांगली- १, औरंगाबाद- १६, बीड- १३, परभणी- २, उस्मानाबाद- ९, जालना- २७, लातूर- ६, आणि बुलडाणा- ५. एकूण- २३८.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0